नानीबाई गेली
वय- अंदाजे ७८ वर्षे !!!
गावात आली लग्न होउन
७ व्या, ८ व्या वर्षी
७० वर्षे गावातच
माहेरपणालाही गेली, न गेली
तिलाही आठवत नव्हतं
कधीतरी नवरा गेला
मूलबाळ नाही...
४०० उम्बर्यांचा गाव
१०-२० आत्मीय
बसण्या, उठण्याची घरं
गावाशेजारची नदी
ओढयासारखी
आजूबाजूची शेतं
शंकराचं मंदिर
एसटीचा थांबा
एवढंच नानीचं जग...
७० वर्षांचं आयुष्य...
आधाराला
७० पेक्षाही कमी गोष्टी
या जगात आली... गेली...
पेपरमध्ये बातमीही नाही...
गावात गेलो की
जठराग्नी शांत व्हायचा
तृप्त व्हायचा
नानीच्या हातच्या
गरम गरम भाकरी खाउन
चार शब्दांची देवाण घेवाण
`काय नानीबाई?'
पीठभरल्या हातांनीच उत्तर यायचं
`ठीक आहे मालक'
७० वर्षात तृप्त झालेले
शेकडो मालक
नानीच्या अंत्यसंस्काराला मात्र
२०-२५ डोकी,.... आणि
नानीची आठवण काढणारी
एक मातीची चूल!!!
- श्रीपाद कोठे
नागपूर
वय- अंदाजे ७८ वर्षे !!!
गावात आली लग्न होउन
७ व्या, ८ व्या वर्षी
७० वर्षे गावातच
माहेरपणालाही गेली, न गेली
तिलाही आठवत नव्हतं
कधीतरी नवरा गेला
मूलबाळ नाही...
४०० उम्बर्यांचा गाव
१०-२० आत्मीय
बसण्या, उठण्याची घरं
गावाशेजारची नदी
ओढयासारखी
आजूबाजूची शेतं
शंकराचं मंदिर
एसटीचा थांबा
एवढंच नानीचं जग...
७० वर्षांचं आयुष्य...
आधाराला
७० पेक्षाही कमी गोष्टी
या जगात आली... गेली...
पेपरमध्ये बातमीही नाही...
गावात गेलो की
जठराग्नी शांत व्हायचा
तृप्त व्हायचा
नानीच्या हातच्या
गरम गरम भाकरी खाउन
चार शब्दांची देवाण घेवाण
`काय नानीबाई?'
पीठभरल्या हातांनीच उत्तर यायचं
`ठीक आहे मालक'
७० वर्षात तृप्त झालेले
शेकडो मालक
नानीच्या अंत्यसंस्काराला मात्र
२०-२५ डोकी,.... आणि
नानीची आठवण काढणारी
एक मातीची चूल!!!
- श्रीपाद कोठे
नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा