सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा सावरतोय
स्वत:ची लक्तरे,
नवा तडाखा बसलाय ना,
कोणीतरी बसतो मानगुटीवर
म्हणतो- जीव दे
कधी असतो कसाब
कधी रामलिंग राजू
देऊन टाकतो मी- जीव,
कारण मी?
मी तुझाच अंश ना?
निर्गुण, निराकार
दु:ख नाही, वेदना नाही
शांति शांति शांति...
जातात जीव, जाऊ दे
लुटतात तिजोर्या, लुटू दे
चौकशा करू
निवाडा करू
अपराध्यांना शिक्षा करू
सच्चिदानंदी शांतपणाने...
शेवटी पापाचा घडा भरायला हवा ना
शंभर पापे झाल्यावरच होईल ना
शिरच्छेद शिशुपालाचा...
वा रे सौदागर
एका डोक्यासाठी
शंभर डोकी हवीत तुला,
पहिल्याच पापाला का रे
घालत नाहीस घाव?
न पेक्षा
एकदा मोठ्या मनाने
देऊन टाक ना
स्वत:च्या षंढत्वाचा कबुलीजबाब...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा