शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

पाऊस आणि दुष्काळ

खूप खूप पाऊस पडतो
अन येतो ओला दुष्काळ
नाही लागत हाती पीकपाणी
होते पडझड सगळी
घरांची, वास्तूंची
सामानाची, मनांची
माणसांची, पशूंची;
असलेलंही जातं भिजून
असलेलंही जातं किडून,
रोगराई, संसर्गाला
सुमार नसतो काही,
चोऱ्याचपाट्या वाढतात;
होत्याचं नव्हतं होतं झटपट,
नाही म्हणायला मिळते पाणी
होते सोय तेवढीच...
********************
कधी कधी नाहीच पडत पाऊस
मग येतो दुष्काळ कोरडा
किडुक मिडुक संपून जातं
दशा होते अन्नान्न,
डीहायड्रेशनने दगावतात माणसे
दगावतात पशू पक्षी
लागतात गावे देशोधडीला,
नाही म्हणायला
घरे राहतात जशीच्या तशी
कुलूपबंद
माणसे परतण्याची आशा धरून;
हळूहळू विरत जातं सारं...
********************
भावनांचाही
पाऊस असतो म्हणतात -

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ७ डिसेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा