हे जग खूप सुंदर आहे,
हे जग खूप कुरूप आहे;
हे जग खूप चांगलं आहे,
हे जग खूप वाईट आहे;
हे जग म्हणजे स्वर्ग जणू,
हे जग म्हणजे निव्वळ नरक;
सगळी माणसं चांगलीच असतात,
माणूस चांगला असणं शक्यच नाही;
प्रयत्नाला काहीही असाध्य नाही,
प्रयत्नाने काहीच साध्य होत नाही;
जीवनात चढउतार येतच असतात,
जीवनात काहीही घडत नसतं;
प्रकाश हेच जीवनाचं वास्तव,
अंधार हेच वास्तविक जीवन;
षड्रिपु सुटता सुटत नाहीत,
ठरवलं की क्षणात षड्रिपु सुटतात;
जीवन म्हणजे मौजमजा करणे,
जीवन ही गांभीर्याने घेण्याची बाब;
जीवन म्हणजे निरर्थकता,
अर्थपूर्णता म्हणजेच जीवन;
काय खरं, काय खोटं?
चक्रव्यूह प्रश्नांचा...
***************
'तुझी कविता छान आहे
पण खोटी आहे...'
ज्येष्ठ कवीने सांगितले
नवोदित पुरस्कारप्राप्त कवीला...
'खरी करायला काय करू?'
नवोदिताने विचारले...
प्रत्येक ओळीच्या शेवटी
'कोणाकोणासाठी, कधीकधी'
एवढं फक्त जोड !!
हे जग खूप कुरूप आहे;
हे जग खूप चांगलं आहे,
हे जग खूप वाईट आहे;
हे जग म्हणजे स्वर्ग जणू,
हे जग म्हणजे निव्वळ नरक;
सगळी माणसं चांगलीच असतात,
माणूस चांगला असणं शक्यच नाही;
प्रयत्नाला काहीही असाध्य नाही,
प्रयत्नाने काहीच साध्य होत नाही;
जीवनात चढउतार येतच असतात,
जीवनात काहीही घडत नसतं;
प्रकाश हेच जीवनाचं वास्तव,
अंधार हेच वास्तविक जीवन;
षड्रिपु सुटता सुटत नाहीत,
ठरवलं की क्षणात षड्रिपु सुटतात;
जीवन म्हणजे मौजमजा करणे,
जीवन ही गांभीर्याने घेण्याची बाब;
जीवन म्हणजे निरर्थकता,
अर्थपूर्णता म्हणजेच जीवन;
काय खरं, काय खोटं?
चक्रव्यूह प्रश्नांचा...
***************
'तुझी कविता छान आहे
पण खोटी आहे...'
ज्येष्ठ कवीने सांगितले
नवोदित पुरस्कारप्राप्त कवीला...
'खरी करायला काय करू?'
नवोदिताने विचारले...
प्रत्येक ओळीच्या शेवटी
'कोणाकोणासाठी, कधीकधी'
एवढं फक्त जोड !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २४ जून २०१९
नागपूर
सोमवार, २४ जून २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा