गंगामैय्या मला ठाऊक आहे
आज तुझ्यातून वाहिलेलं पाणी
केवळ पाणी नव्हतं,
खरं तर ते केवळ पाणी
नसतंच कधी
ते तीर्थ असतं नेहमीच,
पण आज ते तीर्थही नव्हतं,
आज तो प्रवाह होता अश्रूंचा...
कितीतरी काळ दाबून धरलेल्या
अंतरीच्या असंख्य संमिश्र भावना
उमाळ्याने बाहेर पडल्या आज...
आनंद, दु:ख, अवहेलना
दुर्लक्ष, समाधान, आशा
या साऱ्यांचेच गोड, खारट
आंबट, तुरट, उष्ण अश्रू...
त्या अश्रूंचाच तो प्रवाह
कलकल करत वाहत होता
संध्यामग्न अदृष्टाला
मनीचा आवेग सांगण्यासाठी...
किती दीर्घ काळानंतर आज
लाभला तुला सन्मान
डावलला गेलेला !!
तुझ्या लेकरांचा नेता,
ज्या भूमीसाठी
धावतेस तू युगेयुगे
त्या भूमीचा प्रतिनिधी
श्रद्धापूर्वक करत होता तुझी वंदना
जणू संपूर्ण भरतभूमीच
जमली होती तुझ्या स्तवाला
लाभले होते तुला
आज तुझे सम्राज्ञी पद !!
जगाने पाहिले, अनुभवले ते...
पण हे सर्वोच्च स्थान
म्हणजे केवळ गौरव नाही
तुझ्या कर्तृत्वाचा,
तो गौरव नाही
तुझ्या सोसण्याचा,
तो नाही गौरव
तुझ्या आणि या भूमीच्या
देवाणघेवाणीच्या
महा उद्यमाचा...
तो गौरव आहे
जड चेतनाला
कृतज्ञ वंदन करणाऱ्या भावनेचा,
तो गौरव आहे
य:कश्चित समजल्या जाणाऱ्या
धुलीकणांना, जलकणांना
ईश स्वरूपात पाहण्याचा,
तो गौरव आहे
माणसाच्या मनाला
अत्युच्च भावांनी आभाळमय करण्याच्या
हजारो वर्षांच्या अथक प्रयत्नांचा,
तो गौरव आहे
छोट्याशा माणसाला
अनंत करण्याच्या ध्यासाचा...
या भूमीला
या भूमी-मानसाला
तुच्छ लेखले जगाने
डावललेही
अन येथील भूमीपुत्रांनीही
मिळवला आपला आवाज
त्यांच्याच आवाजात,
अन याहीपेक्षा वेदना होती-
तुला, या भूमीला, तुझ्या पुत्रांना
कायमस्वरूपी
खुजे करण्याच्या प्रयत्नांची
त्यांचं भावविश्व खुरटं करण्याची
माणसाचं मोठं होणं नाकारण्याची...
आजचा क्षण सांगून गेला
'होय-
खुजेपणाचे दिवस भरले आहेत
या भूमीने जवळ केला आहे
पुन्हा एकदा
अनंताचा राजमार्ग'
तू दिलेल्या संस्काराचा हा विजय आहे...
गंगामय्या !!
आजचे तुझे पाणी
या साऱ्यांमुळेच
तुझ्या डोळ्यात तरळलेले
अश्रू आहेत
मला ठाऊक आहे...
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २५ एप्रिल २०१९
आज तुझ्यातून वाहिलेलं पाणी
केवळ पाणी नव्हतं,
खरं तर ते केवळ पाणी
नसतंच कधी
ते तीर्थ असतं नेहमीच,
पण आज ते तीर्थही नव्हतं,
आज तो प्रवाह होता अश्रूंचा...
कितीतरी काळ दाबून धरलेल्या
अंतरीच्या असंख्य संमिश्र भावना
उमाळ्याने बाहेर पडल्या आज...
आनंद, दु:ख, अवहेलना
दुर्लक्ष, समाधान, आशा
या साऱ्यांचेच गोड, खारट
आंबट, तुरट, उष्ण अश्रू...
त्या अश्रूंचाच तो प्रवाह
कलकल करत वाहत होता
संध्यामग्न अदृष्टाला
मनीचा आवेग सांगण्यासाठी...
किती दीर्घ काळानंतर आज
लाभला तुला सन्मान
डावलला गेलेला !!
तुझ्या लेकरांचा नेता,
ज्या भूमीसाठी
धावतेस तू युगेयुगे
त्या भूमीचा प्रतिनिधी
श्रद्धापूर्वक करत होता तुझी वंदना
जणू संपूर्ण भरतभूमीच
जमली होती तुझ्या स्तवाला
लाभले होते तुला
आज तुझे सम्राज्ञी पद !!
जगाने पाहिले, अनुभवले ते...
पण हे सर्वोच्च स्थान
म्हणजे केवळ गौरव नाही
तुझ्या कर्तृत्वाचा,
तो गौरव नाही
तुझ्या सोसण्याचा,
तो नाही गौरव
तुझ्या आणि या भूमीच्या
देवाणघेवाणीच्या
महा उद्यमाचा...
तो गौरव आहे
जड चेतनाला
कृतज्ञ वंदन करणाऱ्या भावनेचा,
तो गौरव आहे
य:कश्चित समजल्या जाणाऱ्या
धुलीकणांना, जलकणांना
ईश स्वरूपात पाहण्याचा,
तो गौरव आहे
माणसाच्या मनाला
अत्युच्च भावांनी आभाळमय करण्याच्या
हजारो वर्षांच्या अथक प्रयत्नांचा,
तो गौरव आहे
छोट्याशा माणसाला
अनंत करण्याच्या ध्यासाचा...
या भूमीला
या भूमी-मानसाला
तुच्छ लेखले जगाने
डावललेही
अन येथील भूमीपुत्रांनीही
मिळवला आपला आवाज
त्यांच्याच आवाजात,
अन याहीपेक्षा वेदना होती-
तुला, या भूमीला, तुझ्या पुत्रांना
कायमस्वरूपी
खुजे करण्याच्या प्रयत्नांची
त्यांचं भावविश्व खुरटं करण्याची
माणसाचं मोठं होणं नाकारण्याची...
आजचा क्षण सांगून गेला
'होय-
खुजेपणाचे दिवस भरले आहेत
या भूमीने जवळ केला आहे
पुन्हा एकदा
अनंताचा राजमार्ग'
तू दिलेल्या संस्काराचा हा विजय आहे...
गंगामय्या !!
आजचे तुझे पाणी
या साऱ्यांमुळेच
तुझ्या डोळ्यात तरळलेले
अश्रू आहेत
मला ठाऊक आहे...
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २५ एप्रिल २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा