तुला सांगू?
मलाही येत असे राग तुझा
असा कसा तू दुबळा?
असा कसा कोणाहीसमोर पडतं घेतोस?
कोणीही यावे अन टपली मारून जावे?
पण आता प्रकाश पडतोय थोडा थोडा
राग गेला का? नाही ठाऊक
पण शांत झालाय हे खरं...
नाही मागितली कधी सवलत
नाही म्हटलेस कधी-
`मी राजा आहे
मला हवेत विशेष अधिकार;
मला नाही विचारायचेत प्रश्न;
नाही घ्यायच्या शंका माझ्यावर;'
आज पाहतो चहूभोवताल
आंधळ्या विश्वासाची भिक मागणारे
त्यासाठी वेगवेगळी कुंपणे उभारणारे
या कुंपणांसाठी उपद्व्याप करणारे...
आणि तरीही
विश्वासासाठी पुढे केलेली ओंजळ
रीतीच राहणाऱ्या झुंडी
जेव्हा पाहतो;
न्यायासनांचे पोकळ निर्णय
किंवा जनमताचे कोट्यवधी रेटे सुद्धा
विश्वासाची ओंजळ नाही भरू शकत,
आतलं रीतेपण नाही भरू शकत,
सरणावरही वाहिली जातात
फुले अविश्वासाची, तेव्हा....
तेव्हा.... दिसतो प्रकाशाचा कवडसा तुझ्याजवळ...
तीव्रता मिटून जाते तुझ्यावरच्या रागाची....
राघवा....
तुला, फक्त तुलाच ठाऊक होते
मोल आणि मूल्य विश्वासाचे
तुलाच ठाऊक होती किंमत
त्यासाठी मोजावी लागणारी
तू चुकवलीस ती...
जानकीला करायला लावलीस अग्नीपरीक्षा
तेव्हा तुझ्या आत उफाळलेले अग्नीचे तांडव
शतकोटी ज्वालामुखींचे उद्रेक
सहस्रकोटी वणव्यांचे लोळ
या साऱ्याचा दाह
कोणाला ठाऊक असणार तुझ्याशिवाय?
हां... एक जानकी सोडून...
जानकीहृदय राघव
राघवहृदय जानकी
दिला प्रतिसाद एकमेकांना
सोसले सारे काही
ठरवले किंमत मोजायची
जी पडेल ती
पण विश्वास पदरी पाडून घ्यायचाच
अन तसेच झाले...
ना मागितली दाद अन्यायाची
ना उभे केले जनसमर्थन
केवळ चुकवली अपार मौन किंमत
आणि भरून गेली तुमची ओंजळ
युगेयुगे वाहणाऱ्या नि:शंक विश्वासाने !!
काळालाही शक्य नाही
हा विश्वास हिरावून घेणे !!
हे खरंय की
तू दूषणेही सोसलीस
ही किंमत चुकवण्यासाठी,
पण दूषणे देणारेही
धक्का नाही लावू शकले
तू कमावलेल्या विश्वासाला...
रघुनंदना-
विश्वासाची भीक मागणारे तांडे पाहतो
तेव्हा तू कळतोस पुन्हा नव्याने
अन वाटून जाते
महाभारते होत राहतील
विश्वास अविश्वासाच्या नौका
येत राहतील, जात राहतील
पण काळसरितेवर
उठलेला रामायणाचा तरंग
पुन्हा उठणार नाही
जानकी राघवाची जोडी
पुन्हा होणार नाही
युगजयी नि:शंकता कधी विरणार नाही
तू दिलेली किंमत कधी सरणार नाही !!
मलाही येत असे राग तुझा
असा कसा तू दुबळा?
असा कसा कोणाहीसमोर पडतं घेतोस?
कोणीही यावे अन टपली मारून जावे?
पण आता प्रकाश पडतोय थोडा थोडा
राग गेला का? नाही ठाऊक
पण शांत झालाय हे खरं...
नाही मागितली कधी सवलत
नाही म्हटलेस कधी-
`मी राजा आहे
मला हवेत विशेष अधिकार;
मला नाही विचारायचेत प्रश्न;
नाही घ्यायच्या शंका माझ्यावर;'
आज पाहतो चहूभोवताल
आंधळ्या विश्वासाची भिक मागणारे
त्यासाठी वेगवेगळी कुंपणे उभारणारे
या कुंपणांसाठी उपद्व्याप करणारे...
आणि तरीही
विश्वासासाठी पुढे केलेली ओंजळ
रीतीच राहणाऱ्या झुंडी
जेव्हा पाहतो;
न्यायासनांचे पोकळ निर्णय
किंवा जनमताचे कोट्यवधी रेटे सुद्धा
विश्वासाची ओंजळ नाही भरू शकत,
आतलं रीतेपण नाही भरू शकत,
सरणावरही वाहिली जातात
फुले अविश्वासाची, तेव्हा....
तेव्हा.... दिसतो प्रकाशाचा कवडसा तुझ्याजवळ...
तीव्रता मिटून जाते तुझ्यावरच्या रागाची....
राघवा....
तुला, फक्त तुलाच ठाऊक होते
मोल आणि मूल्य विश्वासाचे
तुलाच ठाऊक होती किंमत
त्यासाठी मोजावी लागणारी
तू चुकवलीस ती...
जानकीला करायला लावलीस अग्नीपरीक्षा
तेव्हा तुझ्या आत उफाळलेले अग्नीचे तांडव
शतकोटी ज्वालामुखींचे उद्रेक
सहस्रकोटी वणव्यांचे लोळ
या साऱ्याचा दाह
कोणाला ठाऊक असणार तुझ्याशिवाय?
हां... एक जानकी सोडून...
जानकीहृदय राघव
राघवहृदय जानकी
दिला प्रतिसाद एकमेकांना
सोसले सारे काही
ठरवले किंमत मोजायची
जी पडेल ती
पण विश्वास पदरी पाडून घ्यायचाच
अन तसेच झाले...
ना मागितली दाद अन्यायाची
ना उभे केले जनसमर्थन
केवळ चुकवली अपार मौन किंमत
आणि भरून गेली तुमची ओंजळ
युगेयुगे वाहणाऱ्या नि:शंक विश्वासाने !!
काळालाही शक्य नाही
हा विश्वास हिरावून घेणे !!
हे खरंय की
तू दूषणेही सोसलीस
ही किंमत चुकवण्यासाठी,
पण दूषणे देणारेही
धक्का नाही लावू शकले
तू कमावलेल्या विश्वासाला...
रघुनंदना-
विश्वासाची भीक मागणारे तांडे पाहतो
तेव्हा तू कळतोस पुन्हा नव्याने
अन वाटून जाते
महाभारते होत राहतील
विश्वास अविश्वासाच्या नौका
येत राहतील, जात राहतील
पण काळसरितेवर
उठलेला रामायणाचा तरंग
पुन्हा उठणार नाही
जानकी राघवाची जोडी
पुन्हा होणार नाही
युगजयी नि:शंकता कधी विरणार नाही
तू दिलेली किंमत कधी सरणार नाही !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १२ एप्रिल २०१९
नागपूर
शुक्रवार, १२ एप्रिल २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा